छत्रपती संभाजीनगर - यंदाच्या पावसाळ्यात आणि पावसाळा संपल्यानंतरही मराठवाड्यात पावसाने कहर केला होता. यामुळे शेतीसोबतच शाळांची पडझड, रस्ते वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या होत्या..खासकरून सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये अतिवृष्टी होऊन छत्रपती संभाजीनगर विभागातील दोन हजार ७०१ किलोमीटरच्या रस्त्यांचे आणि एक हजार ५०४ पुलांचे अतोनात नुकसान झाले होते. शासकीय इमारती, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, तलाव, शाळा, महावितरण आदींच्या नुकसानीपोटी दोन हजार ४३२ कोटींची गरज असतानाही अद्याप एक रुपयाही मिळालेला नाही..नुकसान झालेल्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले होते. त्यासाठी राज्य सरकारकडे निधीचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर राज्य सरकारने मदतीची घोषणाही केली.परंतु त्यापैकी एकही रुपया सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर संबंधित विभागांना मिळाला नाही. महत्त्वाचे म्हणजे, छत्रपती संभाजीनगर विभागातील एक हजार ५०४ पुलांपैकी तब्बल ४०० पूल अक्षरशः वाहून गेले आहेत..संपूर्ण विभागातील जिल्हानिहाय पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान किती आहे, याची पाहणी ऑक्टोबर २०२५ मध्ये झाली; परंतु डागडुजीसाठी सार्वजनिक विभागाला निधीच मिळाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.