Marathwada Flood
sakal
छत्रपती संभाजीनगर
Marathwada Flood: पाऊस थांबला, पूर कायम; अनेक धरणांमधून विसर्ग सुरूच, पिके अद्याप पाण्याखाली
Jayakwadi Dam: मराठवाड्यात पावसाने उसंत घेतली असली तरी जायकवाडी धरणातून सुरू असलेला मोठा विसर्ग कायम आहे. बीड, जालना, परभणीतील हजारो नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने सोमवारी (ता. २९) उसंत घेतली असली, तरी धरणांतून मोठा विसर्ग आणि नद्यांचा पूर कायम आहे. जायकवाडी धरणातून केलेल्या मोठ्या विसर्गामुळे बीड, जालना, परभणी जिल्ह्यांतील अनेक गावांतील सुमारे २५ हजार नागरिकांचे प्रशासनाने सुरक्षितस्थळी स्थलांतर केले.