वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे कायदे,इम्तियाज जलीलांची सरकारवर टीका

इम्तियाज जलील राज्य सरकारवर संतापले
Imtiaz Jaleel
Imtiaz Jaleelesakal

औरंगाबाद : येत्या २७ नोव्हेंबर रोजी मुंबईत एमआयएम (AIMIM) पक्षाची तिरंगा रॅली (Tiranga Rally) होणार होती. मात्र त्याला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. याबाबत खासदार तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) रॅलीला परवानगी दिली जाते. त्याचवेळी आमच्या २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रॅलीला परवानगी नाकारली जाते. याबाबत महाराष्ट्र सरकारने स्पष्टीकरण देऊ शकेल का?, असा सवाल जलील यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. पुढे आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, या राज्यात वेगवेगळ्या लोकांना वेगळे कायदे आहेत का? (Aurangabad)

Imtiaz Jaleel
शनिवारी लग्न अन् सोमवारी केली आत्महत्या, नवरदेवाचे टोकाचे पाऊल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे पोलिस महासंचालकांना टॅग करित त्यांना उत्तर देण्याची विनंती खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. एमआयएमच्या तिरंगा रॅलीची आगामी तारीख लवकरच सांगितली जाईल. अन्यायाविरुद्ध लढा सुरुच राहिल असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com