

Chhatrapati Sambhajinagar
esakal
टाकळी राजेराय: ‘माय काय सांगू... लग्न होऊन पन्नास वर्स लोटली, आता नातवाचंही लग्न ठरलंय; पण पाण्यासाठी वणवण काही थांबली नाही. डोक्यावरचा हंडा कधी खाली उतरणार देवच जाणे!’ खुलताबाद तालुक्यातील जमालवाडी येथील एका आजीचे हे आर्त उद्गार ऐकले की काळजाचा ठोका चुकतो. देश एकीकडे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना, जमालवाडीतील महिला, वृद्ध आणि चिमुकल्यांच्या नशिबी मात्र पाण्यासाठी आजही रानोमाळ भटकंतीच लिहिलेली आहे.