Jayakwadi Dam: जायकवाडी धरणातून विसर्ग बंद, आवक घटली, जलसाठा ९३.४३ टक्क्यांवर

Jayakwadi Dam Water Storage Reaches 93.43%: जायकवाडी धरणातील जलसाठा ९३.४३ टक्क्यांवर पोहोचला असून आवक घटल्याने गोदावरी नदीपात्रातील विसर्ग बंद करण्यात आला आहे.
Jayakwadi Dam

Jayakwadi Dam

esakal

Updated on

पैठण: जायकवाडी (नाथसागर) धरणात ९३.४३ टक्के जलसाठा असून आवक घटल्याने मंगळवारी (ता. ११) रात्री एकपासून गोदावरी नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग बंद करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातून आवक झाल्याने ‘जायकवाडी’ धरण भरले. साठा नियंत्रित ठेवण्यासाठी चार ऑगस्टपासून धरणाचे १८ दरवाजे प्रत्येकी अर्धा फूट उघडून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com