

Jayakwadi Dam
esakal
पैठण: नाशिक जिल्ह्यातून सुरू असलेली आवक, पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या (नाथसागर) पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरण ८५ टक्के भरले असून कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे काही प्रमाणात उघडून पाण्याचा विसर्ग करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा जायकवाडी पाटबंधारे विभागाने रविवारी (ता. दोन) दिला आहे. जायकवाडी धरणात आज सायंकाळपर्यंत ३३ हजार क्युसेकने पाण्याची आवक पान २ वर