

Chhatrapati Sambhajinagar
esakal
कन्नड: गेल्या आठवड्यापासून तालुक्यात असलेल्या ढगाळ हवामानामुळे आणि अवकाळी पावसाच्या संकटामुळे थांबलेल्या उन्हाळी कामांना आता पुन्हा वेग आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा चटका वाढू लागल्याने ग्रामीण भागातील महिलांनी आपला कल ‘वाळवण’ करण्याकडे वळवला आहे. गावागावांत आणि गल्लोगल्ली कुरडई, पापड आणि खारवड्या करण्याची लगबग पाहायला मिळत आहे.