

Chhatrapati Sambhajinagar
esakal
करमाड: करमाड औद्योगिक वसाहतीचा (एमआयडीसी) वेगाने विस्तार होत असताना, दुसरीकडे वाढते प्रदूषण, दूषित पाणी आणि रासायनिक कचऱ्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नाल्यांमध्ये सोडले जात असल्याने, परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि भूजल स्त्रोत धोक्यात आले आहेत. अनेक ठिकाणी विहिरींमध्ये हिरवट रंगाचे तसेच फेसाळ पाणी आढळून येत आहे.