

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: खरीप हंगामात जिल्ह्यात सहा लाख ९७ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर पेरणीची शक्यता आहे. त्यासाठी ३१ हजार ३२ क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. सर्वाधिक लागवड कपाशीची असून, सात हजार ७११ क्विंटल (१७ लाख १३ हजार पाकिटे ) बियाण्याची गरज आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली.