Maharashtra farmer police action news
esakal
लातूर : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीच्या तयारीसाठी बैलजोडी खरेदी करून गावाकडे परतणाऱ्या बाप-लेकांवर गुन्हा दाखल झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अरजखेडा येथील शेतकरी भीमराव सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा महेश सूर्यवंशी यांनी पाटोदा येथील बाजारातून शेतीसाठी बैलजोडी खरेदी केली होती. जनावर खरेदी-विक्रीचे ग्रामपंचायतीचे अधिकृत दाखले त्यांच्या जवळ असतानाही त्यांना वाटेत अडवण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.