

Chhatrapati Sambhajinagar
esakal
फुलंब्री: तालुक्यातील महाल किन्होळा येथे महिला शेतकरी गटांनी पर्यावरण संवर्धनाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेत वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवण्यासाठी ‘माउली’ आणि ‘जय मल्हार’ या दोन महिला शेतकरी गटांनी पुढाकार घेतला. पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली या महिलांनी श्रमदानातून जंगल परिसरात कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत.