
छत्रपती संभाजीनगर : गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश राजा जॉर्ज याच्या स्तुतीसाठी ‘जन गण मन’ हे स्तुती गीत लिहिले. त्यामुळे ‘जन गण मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ हे भारताचे राष्ट्रगीत असायला हवे, असे विधान महंत रामगिरी महाराज यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी (ता. सात) एका कार्यक्रमात केले.