Maharashtra Education
sakal
छत्रपती संभाजीनगर
Maharashtra Education: गैरप्रकार करणारी परीक्षा केंद्रे कायमस्वरूपी बंद; राज्य मंडळाचा कडक पवित्रा, नव्या केंद्रांना परवानगी नाही
Maharashtra State Board: राज्य मंडळाने परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कडक भूमिका घेतली असून, भविष्यातील गैरप्रकार करणारी केंद्रे कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत.शहरी, ग्रामीण, आणि दुर्गम भागातील परीक्षा केंद्रांची व्यवस्था नव्या कडक निकषांसह पुनर्रचित केली जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रांवर दरवर्षी उघडकीस येणाऱ्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी राज्य मंडळाने यंदा कडक भूमिका घेतली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेत ज्या केंद्रांवर गैरप्रकार सिद्ध होतील, ती सर्व केंद्रे कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत. विभागीय मंडळांना यासंदर्भात तातडीने कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, संपूर्ण परीक्षा केंद्र व्यवस्थेची मोठी पुनर्रचना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

