

Chandrashekhar Bawankule
sakal
कन्नड : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महायुती सरकार सकारात्मक पावले उचलत आहे. मात्र, सरसकट कर्जमाफी न करता गरीब व दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या शेतीकर्जावरील व्याज माफ करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, यासाठी महायुती सरकारकडून एक प्रभावी योजना आणली जाणार असल्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (ता. ४) दिले. तालुक्यातील जेहुर येथे भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.