
Manoj Jarange
sakal
छत्रपती संभाजीनगर : ‘मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात हैदराबाद गॅझेटनुसार असलेला जीआर रद्द करण्यासाठी विजय वडेट्टीवार हे ओबीसींचा मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा ओबीसींसाठी नसून केवळ काँग्रेसला राजकीय फायदा मिळवून देण्यासाठी आहे’, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केला. हे सर्व राहुल गांधींच्या सूचनेनुसार घडत असल्याचा दावाही त्यांनी रविवारी (ता. पाच) केला.