
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात गेल्या पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे सात जिल्ह्यांतील तब्बल ३ लाख ५८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, तर मृतांचा आकडाही सहावरून अकरावर गेला आहे. याशिवाय बाधित गावांची संख्या ११५४ इतकी झाली असून, ५८८ घरांची पडझड झाली आहे.