Jayakwadi Dam: अन् पैठणकरांनी सोडला सुटकेचा निःश्वास..! ‘जायकवाडी’चा विसर्ग कमी केल्याने दिलासा, व्यवहार पूर्ववत

Godavari Flood: जायकवाडी धरणातून रविवारी तीन लाख क्युसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग सोडल्याने पैठण शहरात पुराचे पाणी शिरले. मात्र, सोमवारी सकाळी विसर्ग कमी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
Jayakwadi Dam

Jayakwadi Dam

sakal

Updated on

पैठण : जायकवाडी धरणातून रविवारी (ता. २८) मोठ्या जलविसर्गामुळे गोदावरी नदीने रौद्ररूप धारण केले. पुराचे पाणी शहरात शिरल्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. आता पुराच्या विळख्यात शहर अडकले जाते की काय अशी भीती प्रत्येकाच्या मनात घर करून राहिली होती. मात्र, धरणातून विसर्ग कमी करण्यात आल्याने पैठणकरांचा जीव भांड्यात पडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com