

Chhatrapati Sambhajinagar
esakal
जायकवाडी: राज्यातील काही भागांत हवामान खात्याने विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत.
पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांनी २२ एप्रिलपासून घाईघाईने कांदा काढणीला सुरवात केली असून, सध्या शिवारात काढणीची लगबग पाहायला मिळत आहे. मात्र, निसर्गाची अनिश्चितता आणि घसरलेले दर यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.