

Chhatrapati Sambhajinagar
esakal
जायकवाडी: पैठण नगर परिषदेच्या नियोजनशून्य आणि ढिसाळ कारभारामुळे ऐन अक्षय्य तृतीयेसारख्या मोठ्या सणाच्या दिवशी रविवारी (ता. १९) संपूर्ण पैठण शहरावर पाणीबाणी ओढवली आहे. सलग दोन दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असून, सणाच्या दिवशी चक्क विकतचे पाणी घेण्याची नामुष्की पैठणकरांवर आली आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.