Aurangabad| धावत्या बसने घेतली पेट, चालकामुळे २८ प्रवाशांचा वाचला जीव

पेट घेतल्याने बस जळून खाक झाली.
Burning Bus In Aurangabad
Burning Bus In Aurangabadesakal

सिल्लोड (जि.औरंगाबाद ) : औरंगाबाद (Aurangabad) -जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा गावाजवळ गुरुवारी (ता.२४) पहाटेच्या सुमारास धावत्या बसने पेट घेतल्याने बस जळून खाक झाली. सुदैवाने बसचालक, वाहकासह बसमधील २८ प्रवासी सुखरूप असून, परिसरातील नागरिकांसह अजिंठा पोलिसांनी वेळीच धाव घेऊन आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती अशी की, पुणे येथून मलकापूरकडे जाणारी श्री साई राम ट्रॅव्हल्सची बस (एमएच १२ इक्यू ९००७) अजिंठा (Ajanta) गावालगत आली. (Running Bus Catch Fire On Aurangabad Jalgaon Highway , 28 Passengers Safe)

Burning Bus In Aurangabad
औरंगाबादेत कारचा भीषण अपघात; दोन जण ठार, ४ गंभीर

येथे महामार्गावरील भारत दर्शन हॉटेल जवळील वळणावर बसच्या टायरचे लायनर चिटकुन टायर फुटल्याने बसला पहाटे पाच वाजेच्या सुमारास आग लागली. आग लागल्याचे कळताच चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या बाजूला घेत बसमधील २८ प्रवाशांना उतरविल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. घटनेत बस संपूर्णपणे जळून खाक झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com