छत्रपती संभाजीनगर : ‘कुठेय पाणी?’ या वृत्तमालिकेतून छत्रपती संभाजीनगरातील प्रत्येक नागरिकाला रोज मुबलक पाणी मिळवून देण्याचा ध्यास घेतलेल्या ‘सकाळ माध्यम समूहा’ने आता आणखी एक सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. .त्यानुसार शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये त्या-त्या नावाचे फलक दर्शनी भागात लावले असून याद्वारे शहरवासीयांनाच नव्हे, तर पर्यटक, कामानिमित्त इतर शहरांतून येणाऱ्या नागरिकांनाही सुयोग्य मार्ग कळणार आहे..गेल्या १५ ते २० वर्षांपासून पाणीटंचाईच्या खाईत ढकलल्या गेलेल्या नागरिकांच्या त्रासाची दखल घेत ‘सकाळ’ने सलग ४२ दिवस वृत्तमालिका प्रसिद्ध केली. यातून सर्वसामान्यांच्या वेदनेला वाचा फोडण्यात आली. याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला..तसेच, खुद्द मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर पाणी योजनेला गती मिळाली आहे. हीच सामाजिक बांधिलकी जपत आता शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये तसेच विविध भागांमध्ये ‘सकाळ’ने फलक लावले आहेत. याद्वारे नागरिकांना योग्य दिशादर्शन होईल. याचा सर्वांत मोठा फायदा पर्यटक आणि इतर शहरांमधून नियमित संभाजीनगरात येणाऱ्या नागरिकांनाही होणार आहे..Chh. Sambhaji Nagar News : वारकऱ्यांच्या मागण्यांना प्रतिसाद; मुख्यमंत्र्यांनी दिले पालखी सोहळ्याच्या सोयी-सुविधांचे आदेश.सिडको चौक, कामगार चौक, जयभवानीनगर चौक, हनुमान चौक, विजय चौक, पुंडलिकनगर, गजानन महाराज मंदिर, चिश्तिया चौक, एमजीएम हॉस्पिटल, सेव्हन हिल, बीड बायपास, रेल्वे स्टेशन रोड अशा विविध ठिकाणी हे फलक लावले आहेत. शहरात सर्व महत्त्वाच्या ठिकाणी असे फलक लावले जाणार आहेत. शहरवासीयांनी या उपक्रमाचेही स्वागत केले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.