

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही वर्षांपासून शहराच्या विकासात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या ‘स्मार्ट सिटी’ अभियानाचे ३० एप्रिलला अधिकृतपणे ‘पॅकअप’ होणार आहे.राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार हे अभियान बंद होणार असल्याने, त्याअंतर्गत सुरू असलेले सफारी पार्क आणि संत तुकाराम नाट्यगृहासारखे मोठे प्रकल्प आता महापालिकेकडे वर्ग होणार आहेत. आधीच आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेवर या प्रकल्पांमुळे खर्चाचा अतिरिक्त बोजा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.