

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: वाढत्या उन्हाबरोबरच भाजीपाला बाजारात मिरची, अद्रक व लसणाला भाववाढीची फोडणी मिळाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत मिरची व अद्रकच्या भावात २० रुपयांची वाढ होऊन प्रतिकिलो १०० रुपयांवर पोचले. लसूण १५० रुपये किलोवर पोचला आहे. लिंबाचे भाव २०० रुपये किलोवर पोचले होते. त्यात आता ५० रुपयांची घसरण झाली. सध्या १५० रुपये किलोने लिंबू मिळत आहे.