छत्रपती संभाजीनगर - महापालिकेत भाजपच्या सोबतीने शिवसेनेने वीस वर्षांपेक्षा जास्त काळ एकत्र सत्ता भोगली. तत्कालीन युतीत अंबादास दानवेही होते. सत्तेची फळे त्यांनीही चाखली. या काळापासून शहरात पाणीटंचाई सुरू झाली. नंतरच्या काळात पाणीप्रश्न संवेदनशील बनत गेला. आता गळ्याशी आल्यानंतर सर्वपक्षीयांना जाग आली.