Ambadas Danve
sakal
छत्रपती संभाजीनगर - महापालिकेत शिवसेनेचा महापौर असताना तीन दिवसांआड पाणी मिळत होते. पण, आता आठ ते दहा दिवसांआड मिळत आहे, हे सरकारचे पाप आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केली. शहराचे संभाजीनगर नामकरण हे उद्धव ठाकरे यांनी केले असून, भाजपला फुकटचे श्रेय घेण्याची सवयच आहे, असा टोलाही त्यांनी पत्रकार परिषदेत लगावला.