‘बळिराजा’ने दिली गरजूंसाठी साखर

file photo
file photo

पूर्णा (जि. परभणी): ‘हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत बळिराजा साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी गोरगरिबांना पाच क्विंटल साखर येथील सुमन मंगल कार्यालयात सोमवारी (ता. ३०) वाटपासाठी दिली आहे. 
कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. त्याचा एक भाग म्हणून देशात लॉकडाऊन सुरू आहे. ‘हात मदतीचा’ या उपक्रमात पूर्णा शहरातील अनेक दानशूर व्यक्तींनी सहभाग घेतला आहे. आठ दिवसांपासून मजुरीची सर्व कामे ठप्प असल्याने हातावर पोट असलेल्या गरिबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून ‘हात मदतीचा’ या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून  गरजवंतांना धान्य वाटप करण्यास सुरवात केली आहे. 
दरम्यान, सोमवारी (ता. ३०) पूर्णेतील बळिराजा साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव,  महाप्रबंधक अशोक थोरात,  संचालक दिनकर जाधव, पुंजाजी बोंडे, प्रल्हाद ठोंबरे, मनोहर केंद्रे  यांनी नियोजनस्थळी सुमन मंगल कार्यालय येथे भेट देत कारखान्याच्या वतीने पाच क्विंटल  साखर दिली. याबद्दल ‘हात मदतीचा’ या ग्रुपच्या सर्व सदस्यांनी कारखान्याचे आभार व्यक्त केले.

हेही वाचा - रक्तदानासाठी झरीकर सरसावले

सामाजिक बांधिलकी जपली
बळिराजा साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी दिवाळीनिमित्त सर्व शेतकरी बांधवांना प्रत्येकी दहा किलो साखर वाटप केली होती. पाणीटंचाईच्या काळात कानडखेडला मोफत पाइपलाइनद्वारे पाणीवाटप केले. आज गरिबांना लॉकडाऊनमध्येही मदत म्हणून पाच क्विंटल साखर देत यापुढेही संकटकाळी बिकट परीस्थितीत सामाजिक काम करण्याचा माणस त्यांनी व्यक्त केला.
मुन्ना राठोड, सदस्य, हात मदतीचा ग्रुप

हेही वाचा ...

बेघर लोकांना स्वच्छता किटचे वाटप
परभणी :
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने बेघर लोक मोठ्या कठीण परिस्थितीला सामोरे जात आहेत. येथील त्यांच्यासाठी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीजने महापालिकेच्या निवारा केंद्रातील १०० बेघर लोकांना महिनाभर पुरतील एवढ्या स्वच्छता किट दिल्या आहेत. या निवारा केंद्रात गरजेनुसार एचएआरसी संस्था अन्नदान करीत आहे. सध्या स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारातून अन्नाची सोय व्यवस्थित होत आहे. परंतु, कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून स्वच्छता राखण्यासाठी नियमितपणे हात धुणे, अंघोळ आवश्यक आहे. ही गरज ओळखून एचएआरसी संस्थे तर्फे १०० निराधार, बेघर लोकांसाठी १०० स्वच्छता किट वाटप करण्यात आल्या. या वेळी निवारा केंद्राचे विनायक करंडे, सुकेशिनी चौधरी उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्विततेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, सदस्य गोपाल मुरक्या, चंद्रकांत अमीलकंठवार, डॉ. शिवा आयथॉल, उल्हास खंबायतकर आदींनी पुढाकार घेतला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com