
वेळेआधी जन्मललेल्या बाळाची हालचाल नसल्यानं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं. घरच्यांनी बाळाच्या अंत्यसंस्काराची तयारी केली असतानाच अचानक बाळानं हालचाल केली आणि ते रडायला लागलं. बीडच्या अंबाजोगाईत घडलेल्या या घटनेनं खळबळ उडालीय. रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदारपणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.