

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये सामाजिक परिस्थिती मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यात दोन घटकांतील तणावही समोर येत आहेत. सामाजिक घटकांबरोबरच पोलिस दलातील सलोखा कायम ठेवण्यासाठी आणि मतभेद व मनभेद टाळण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी पुढाकार घेतला आहे. पोलिस दलात यापुढे एकमेकांना हाक देताना आडनाव नाही तर नावाने हाक दिली जाईल. तसेच, कर्तव्यावर असताना रील्स काढण्यावरही पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी निर्बंध घातले.