
पारध - शासनाकडून मोठा गाजा वाजा करून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पाहिले -आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत दोन गणवेश देण्याचे जाहीर केले होते. 15 ऑगस्ट झाले, आता 26 जानेवारी आली तरीही भोकरदन तालुक्यातील 14 शाळातील तीन हजार विद्यार्थी गणवेश पासून वंचित असल्यामुळे व शैक्षणिक वर्ष ही संपत आल्याने शालेय समिती व पालकांनी आमरण उपोषण करण्याचा ठराव घेतला आहे. त्यामुळे उर्दू शाळेचे ग्रामीण भागातील गोर -गरिबांची गरजू मुले या गणवेशापासून वंचित असल्याचे चित्र आहे.