

धाराशिव : मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जिल्ह्याच्या विकास प्रकल्पांबाबत काही घोषणा होतील, अशी अपेक्षा होती. गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्री जिल्ह्याला भेट देतील, अशी असलेली फोल ठरल्याने निराशा झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यातून जिल्ह्याच्या हाताला नवीन काय लागले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.