
हिंगोली ः जिल्हात गेल्या दोन दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावूस येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील हरभरा, गहू, हळद व आंबा पिकाचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार गुरुवारी, १८ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह काही वेळ पाऊस झाला तसेच शुक्रवारी, १९ मार्च रोजीही सकाळी व सायंकाळी जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस झाला. या पावसामुळे काढणीस आलेले गहु, हरभरा व हळदीच्या पिकासह आंब्याच्या झाडाला लगडलेले आंबे गळुन पडल्याने नुकसान झाले.
औंढा नागनाथ परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने गहू हरभरा व हळद या पिकाचे नुकसान झाले. सध्या शेत शिवारामध्ये हळद काढणीला वेग आला असून शेतकऱ्यांनी शेतामध्ये हळदीचे ढिग व गव्हाची कापणी करून ढीग लावलेले आहेत. या अवकाळी पावसामुळे हळद व गव्हाचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढून ठेवलेली हळद व कापणी केलेला गहु झाकण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. यावर्षी आंब्याच्या झाडांना चांगल्या कैऱ्या लगडलेल्या आहेत मात्र अवकाळी पावसाने त्या गळुन पडल्या असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
शुक्रवारी सकाळी व सायंकाळी ढगाळ वातावरण होते. तसेच हवेत गारवा निर्माण झाला होता. यावर्षी खरीप व रब्बीच्या पिकाच्या काढणीच्या वेळी पडत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असल्याचे शेतकरी सांगत आहेत. दरम्यान, शनिवारी सकाळी देखील ढगाळ वातावरण होते. हळद उत्पादक शेतकऱ्यांनी अवकाळी पाऊस आला तर काढुन ठेवलेले पिक झाकून ठेवण्याची तयारी करून ठेवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.