जालना : स्थिती पाहूनच शाळांबाबत निर्णय ; राजेश टोपे

शाळांबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे स्पष्टीकरण
rajesh tope
rajesh topesakal

जालना : मुलांमध्ये कोरोना (Corona)संसर्ग होण्याचे प्रमाण अत्‍यल्‍प असले तरी शाळा (School)सुरू करण्यासंदर्भात दोन मतप्रवाह आहेत. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीतही चर्चा झाली आहे. पुढील पंधरा दिवसांतील स्थिती पाहून मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh tope)यांनी रविवारी स्पष्ट केले. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली; तरीही संसर्ग कमी असलेल्या भागांतील शाळा सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.

rajesh tope
नवीन विद्यापीठ विधेयक मागे घ्यावे यासाठी युवा मोर्चा युवती विभागाचा निषेध

जिल्हानिहाय रुग्ण संख्या, रुग्णवाढीचा दर आणि परिणाम, या बाबी जाणूनच शाळांचा निर्णय होणार आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यांत गेल्या फेब्रुवारीपासून बंद असलेल्या शाळा गेल्या दोन-अडीच महिन्यांआधी सुरू झाल्या. त्यानंतर पुन्हा ओमिक्रॉन विषाणूच्या वाढीने निर्बंध लादण्यात आली. त्यात शाळाही बंद केल्या गेल्या. परंतु, या विषाणुचा फारसा धोका नसल्याचे सध्याच्या स्थितीवरून दिसत असल्याने शाळा पुन्हा उघडण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्ट) पुढाकार घेतला असून, शाळा बंदचा आदेश असला तरी, सोमवारपासून (ता.१७) वर्ग भरविण्याची तयारी ‘मेस्टा’ने केली आहे. त्यावरून विद्यार्थी-पालकांत संभ्रम निर्माण झाला आहे.

स्थिती पाहूनच निर्णय

या पार्श्वभूमीवर टोपे यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली. ‘‘कोरोनाचा नियमित आढावा घेण्यात येत आहे. शाळा सुरू करण्याची मागणी होत असली तरी, तुर्त त्या बंदच राहतील. मात्र कोरोनाचा ससंर्ग नसलेल्या भागांचा आढावा घेऊन, तेथील व्यवहार पूर्ववत करण्याचा प्रयत्न राहणार असून, विशेषत: शाळांचा विचार होईल.’’

rajesh tope
कुरुंदा येथे 'कोरोना' वाढल्याने आजपासून तीन दिवसाचा लॉकडाऊन

लसीकरण पूर्णत्वावर भर

‘लस घेतल्यानंतर रुग्णांना अतिदक्षता विभाग (आयसीयू) आणि व्हेंटिलेटरची गरज भासणार नाही, असे सर्वसाधारणपणे लक्षात आले आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस घेतली पाहिजे. राज्यात उर्वरित लसीकरणावर भर दिला जात आहे,’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. टोपे म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लावलेल्या निर्बंधांचे तंतोतंत पालन करण्याचे मोठे आव्‍हान आहे. कोरोनासंदर्भातील नागरिकांच्या मनातील भीती संपली आहे, असे चित्र दिसते. मात्र रुग्णवाढ मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत राहिली, काळजी घेतली नाही तर दुसऱ्या लाटेप्रमाणे मृत्यूदरही वाढू शकतो.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंधनकारक नसून ऐच्छिक आहे. राज्यात शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभाग मिशन मोडवर काम करत आहे

- राजेश टोपे, आरोग्य मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com