Dharashiv News: ३६ हजार ‘लाडकीं’ची ई-केवायसी; चुकीच्या माहितीमुळे रखडलेली प्रक्रिया मार्चअखेर पूर्ण

Technical Errors Delayed e-KYC Process: धाराशिव जिल्ह्यात ३६ हजार लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक त्रुटीमुळे विलंब झाला होता. प्रशासनाच्या विशेष प्रयत्नांनी आणि मुदतवाढीचा लाभ घेत महिलांनी ३१ मार्चपूर्वी ई-केवायसी पूर्ण केली.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

धाराशिव: जिल्ह्यातील ३६ हजारांच्या जवळपास लाडक्या बहिणींनी अर्जातील तांत्रिक त्रुटी आणि चुकीच्या माहितीमुळे रखडलेली ई-केवायसी प्रक्रिया ३१ मार्चपूर्वी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने लाडक्या बहिणींनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत.

मात्र, ३६ हजारांपेक्षा अधिक अर्जांमध्ये ई- केवायसी करतेवेळी पर्याय निवडताना झालेल्या चुकीमुळे अशा महिलांची ई- केवायसी पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा होण्यास अडथळा निर्माण झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com