वातावरणातील बदलाने वाढलेत आजार : कोणते आणि काय काळजी घ्यावी ते वाचा  

File photo
File photo

नांदेड : थंडीचे प्रमाण वाढल्याने ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, श्‍वसनाच्या विकारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे डॉक्टरांकडे या आजारांनी त्रस्त असणारे रुग्ण वाढले आहेत. दमा, संधिवाताचे आजारही या काळात बळावत असल्याने काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे. 

गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पार घसरला आहे. मात्र हा पारा घसरल्याने नांदेडकरांना चांगलीच थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे या काळात अनेकांना सर्दी, खोकला, घसा, हातपाय दुखणे असे त्रास होत आहे. दम्यांच्या रुग्णांना थंडीत दम लागण्याचे प्रमाण वाढते. त्याच बरोबर पूर्वी फ्रॅक्चर होऊन गेलेल्या रुग्णांनाही थंडीत फ्रॅक्चर झालेले अवयव दुखण्याचा त्रास होऊ शकतो. थंडी वाढल्याने सर्दी, ताप, खोकला वाढत आहे. 

थंडीमुळे श्‍वसनाचे आजारही वाढत असल्याने दवाखान्यांमध्ये उपचारासाठी रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. थंडीत विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ होते. ज्येष्ठ नागरिकांचे सांध्याचे दुखणे या मोसमात वाढते. शिवाय या काळात  अनेकांना सर्दी, ताप, खोकला याचा त्रास होतो. औषधोपचाराने तो बरा करता येतो. मात्र असे असले तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर कुठलीही औषधे घेऊ नयेत , असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.  

अशी घ्या काळजी
थंडीच्या मोसमात बाहेर पडताना काळजी घ्यावी. थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणूण स्वेटर, मफलर, कानटोपीचा वापर करावा. सर्दी झाल्‍यास गरम पाण्याच्या वाफा घ्याव्यात. बाहेरील खाद्यपदार्थ घेणे टाळावे. सकाळी आणि संध्याकाळी थंडीचे प्रमाण वाढते. त्यामुळे या काळात घराबाहेर पडताना काळजी विशेष घ्यावी. त्रास होत असल्यास त्वरित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

हे देखील तुम्ही बघाच Video : कुत्रे, मांजरांनाही होतो मधुमेह, माणसांनी वाचा तर खरं
 
व्यायामही करा जपून
किमान १५ मिनिटांच्या व्यायामामुळे एन्डॉर्फिक नावाचे संप्रेरक शरीरात तयार होते. हे संप्रेरक थंडीशी लढून शरीराला उष्णता देण्यास मदत करते. त्यामुळे ज्येष्ठांनी सकाळी १५ मिनिटे आणि संध्याकाळी १५ मिनिटे व्यायाम करावा. व्यायाम बगिचात किंवा मैदानात केला पाहिजे असे अजिबात नाही. तो घरातही करता येतो. त्यामुळे शक्यतो हिवाळ्यात पहाटे उठून व्यायाम करत असल्यास योग्य ती काळजी घ्यावी. अतिव्यायामही शरीरास घातक ठरू शकतो, असा सल्लाही वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.
 
ज्येष्ठांनी घ्यावयाची काळजी

  1. वयाच्या साठीनंतर त्वचेच्या मांसपेशींशी असलेला संपर्क कमी होतो. त्यामुळे ज्येष्ठांची त्वचा सैल पडते. या सैल त्वचेवर बाहेरच्या वातावरणाचा लवकरच परिणाम होतो. उन्हाळ्यात तरुणांच्या तुलनेत जास्तीचा घाम येणे, उष्णता वाढणे किंवा थंडीत अधीक हुडगुडी भरणे हे त्यामुळेच घडते.
  2. शिवाय या वयात शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्या नसादेखील कमजोर होतात. त्यामुळे थंडीत कायम उबदार कपडे अंगावर ठेवावेत, असा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com