धीर सोडू नका, खचून जाऊ नका या शब्दात मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

Chief Minister Uddhav Thackeray
Chief Minister Uddhav Thackeray

उस्मानाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काटगाव (ता.तुळजापूर) येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची बुधवारी (ता.२१) पाहणी केली. यावेळी त्यानी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्‍यांना तातडीची मदत म्हणुन धनादेशाचे वाटप करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरुपात पाच शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आले.

काटगाव येथे मुख्यमंत्री ठाकरे यांनी मनोगत व्यक्त करताना योग्य मोबदला देणार असल्याचे सांगितले. दोन दिवसात मंत्रिमंडळाची बैठक होणार असून पंचनामे पूर्ण होतील. त्यामुळे तेव्हा निश्चितपणानं मदत जाहीर करण्याचे आश्वासन त्यानी दिले. मंदिर बंद असुन ते सुध्दा संकट दुर होऊ दे अस साकड तुळजाभवानी मातेकड करत असल्याचे त्यानी सांगितले. श्री.ठाकरे म्हणाले, की मला महाराष्ट्र नवीन नाही. आजची परिस्थिती भयावह आहे, आपण संकट पाहिली नाही असे नाही. मला कल्पना आहे, की तुम्ही मला भेटायला आला आहात, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नुकसानग्रस्त लोकांना म्हणाले. ते पुढे म्हणाले, की मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे.

मी आकडे लावण्यासाठी आलेलो नाही. धीर सोडू नका, खचून जाऊ नका, असा दिलासा मुख्यमंत्री ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री शंकरराव गडाख, मंत्री संदीपान भुमरे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com