Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Dr Abhay Bang speech on Indian education crisis : लातूरमध्ये डॉ. अभय बंग यांनी विद्यापीठांच्या प्रमाणपत्रांच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नोकरीसाठी वेगळ्या परीक्षा घ्याव्या लागतात तर पदवीचा अर्थ काय, असा सवाल त्यांनी केला. भारतातील शिक्षण व्यवस्था संदर्भहीन असून क्रांतिकारी बदलांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
Dr Abhay Bang speech on Indian education crisis

Dr Abhay Bang speech on Indian education crisis

sakal

Updated on

लातूर : विद्यापीठांमध्ये तीन–चार वर्षे शिक्षण घेतल्यानंतर उत्तीर्ण केले जाते आणि प्रमाणपत्र दिले जाते. पण, या प्रमाणपत्राचा विद्यापीठाबाहेर काहीही उपयोग होत नाही. नोकरीसाठी मुलांना पुन्हा वेगळी परीक्षा द्यावी लागते. असेच होणार असेल तर विद्यापीठाचे प्रमाणपत्र बोगस म्हणायचे का? मग पालकांनी विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हा दाखल करायचे का? असा सवाल ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी गुरुवारी (ता. १२) येथे उपस्थित केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com