

Agrarian Crisis: 30 Drowning Farmers Launch Indefinite Water Protest in Amalner
Sakal
कायगाव : जायकवाडीच्या फुगवट्याने वीस वर्षांपासून अमळनेर-लखमापूर (ता.गंगापूर)ची शेती गिळली. उभी पिके मातीमोल झाली. प्रशासन मात्र वेळकाढू भूमिका घेतेय, या निष्ठुर व्यवस्थेला जाग आणण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी अमळनेर शिवारात सोमवारी (ता.१८) मे रोजी कडक उन्हात सकाळी साडे अकरा वाजे पासून जलसमाधी आंदोलनाचा वणवा पेटवला.