- धनंजय शेटेभूम - संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी चिंचपुर ढगे व बेलगाव येथे (ता. २४) रोजी परिसरातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या भागांना भेट देऊन शेतकऱ्यांची व्यथा प्रत्यक्ष ऐकून घेतली..या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला व त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारशी केलेल्या चर्चेची माहिती दिली.यावेळी पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे .शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता मदत द्यावी .त्याच्यामध्ये दिरंगाई केल्यास महाराष्ट्र जाम करून टाकू असे जरांगे पाटील म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या संवादात शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला आहे..त्यांनी सांगितले की मदतीसाठी मयत जनावरांचे बॉडी लागतील असे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेतली असता अनेक जनावरे पूरपाण्यात वाहून गेली आहेत तर काहींचा मृत्यू होऊन दोन दिवस उलटले आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मृत जनावरे ठेवणे शक्य नाही, उलट दुर्गंधीमुळे शेतकऱ्यांचे जीवन संकटात येईल.त्यामुळे अशा अव्यवहार्य अटी रद्द करून शेतकऱ्यांना तात्काळ १०० टक्के आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.पिंपळगाव येथील आत्माराम दातखिळे यांना धीर देताना उपस्थित शासनाच्या अधिकारी यांना सांगितले नुकसानीचे पंचनामे करताना ५० टक्के ६० टक्के असे करू नकात. परस्थिती भयाण आहे..यामुळे प्रत्यक्षात जेवढ्या रुपयांची नुकसान झाली आहे. तेवढ्याच रुपयांचा पंचनामा करा. हा ओला दुष्काळ यापेक्षाही मोठी हानी या शेतकऱ्यांची झालीं आहे. यामुळे सरकारने निकष न लावत जेवढे नुकसान झाले आहे. तेवढी मदत द्यावी अन्यथा महाराष्ट्र बंद केल्याशिवाय पर्याय नाही. शेतमालाचे नुकसान, जनावरांचे मृत्यू, घरांचे झालेले नुकसान या साऱ्या गोष्टी गंभीर आहेत.सरकारने तत्काळ मदतकार्य सुरू करून शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे. या गंभीर बाबी अती वेदनादायी असून, याबाबत अजून संध्याकाळ मुख्यमंत्री फडणवीस व जिल्ह्याचे कलेक्टर यांच्याशी संपर्क करून सविस्तर चर्चा करून तातडीने मदत देण्यास सुरुवात करावी अशी मागणी मी लाऊन धरणार आहे यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही सकारात्मक प्रतिसाद देतील असा विश्वास त्यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिला..दरम्यान ग्रामीण भागातील शेतकरी पावसामुळे उभ्या पिकांच्या नुकसानाने हतबल झाले असून जनावरांच्या मृत्यूने त्यांची व्यथा अधिकच वाढली आहे. या परिस्थितीत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीमुळे शेतकऱ्यांना मानसिक आधार मिळाला आहे. सरकारकडून तातडीने मदत मिळावी, ही अपेक्षा शेतकऱ्यांनी टाहो फोडत व्यक्त केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.