हिंगोली - जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणासाठी तब्बल चार वर्षानंतर मुहूर्त लागला असतानाच पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी या वितरणात खोडा घातला असून, १७ सप्टेंबर रोजी होणारा पुरस्कार वितरण सोहळा रद्द झाला आहे..अशी बातमी 'ईसकाळला' लागताच पालकमंत्र्यांनी ठरलेल्या प्रमाणे पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मोठ्या वादावर पडदा पडला असून शिक्षकातडून सकाळच्या निर्भय पत्रकारीतेचे कौतुक होत आहे..चार वर्षापासून जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची वितरण झाले नव्हते. पुरस्कारांची घोषणा दरवर्षी करण्यात येत होती परंतु वितरण मात्र होत नव्हते. यंदा चौफेर टीका झाल्यानंतर शिक्षण विभागाने १७ सप्टेंबर चा मुहूर्त साधत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिक्षकांना पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते, तशी तयारी देखील करण्यात आली..शिक्षकांना निरोप ही पाठवले होते, परंतु पालकमंत्री झिरवळ यांच्या कार्यालयातून मुक्ती संग्राम दिनाच्या एक दिवस आधीच मंगळवारी जिल्हा परिषदेत फोन धडकला. हा कार्यक्रम पुढे ढकला, साहेबांना वेळ नाही, जेव्हा वेळ असेल तेव्हा हा कार्यक्रम घेऊ असा निरोप आला त्यामुळे शिक्षण विभागात गोंधळ उडाला..ऐनवेळी कार्यक्रम रद्द करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. याबाबत सकाळने ई बातमी प्रसिध्द करत पालकमंत्र्यांच्या या हटवादी निर्णयावर आवाज उठवताच पालकमंत्र्यांनी नरमाईची भुमीका घेत पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याचे जाहीर केले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.