
Nilanga Floods
Sakal
निलंगा : मागील काही दिवसापासून मांजरा व तेरणा नदीच्या प्रवाहाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे दोन्ही नदीला अनेक वेळा पूर आला असून यापूर्वी नदीकाठच्या शेतीचे व खरिप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी या भागातील खचलेल्या शेतकऱ्यांना विशेष पॅकेज द्यावे अशी मागणी नदी व ओढ्याकाठच्या शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे.