घाटनांदूर - पिंपरी (ता. अंबाजोगाई) येथे नगर भोजनातून २०६ ग्रामस्थांना विषबाधा झाली. काहींवर गावातच प्राथमिक उपचार करण्यात आले, तर काही जणांवर अंबाजोगाई, लातूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सहायक जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांनी दिली.