Video : माकडांच्या टोळीच्या उणाडक्या...!

file photo
file photo
Updated on

परभणी : पाण्याच्या, अन्नाच्या शोधात वन्य प्राण्यांची पावले शहरांकडे वळू लागली आहेत. यात माकडांचे प्रमाण अधिक आहे. माकडांची टोळीत जायकवाडी कॅनलच्या परिसरात असलेल्या वसाहतीत दाखल होत आहे. भल्या पहाटेच दाखल होत असलेल्या या माकडांमुळे बच्चेकंपनीची करमणूक होत आहे.

दरम्यान, एक-दोन पांढऱ्या, छोट्या शेपटीच्या माकडांमुळे मात्र, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाली आहे. ती माकडे घरात घुसून सामानाची नासधूस करीत असल्याने महिलावर्गात मोठी भिती निर्माण होत आहे. दिवसेंदिवस होत असलेल्या जंगलावरील अतिक्रमणांमुळे वन्यप्राण्याचा निवारा आणि खाद्य नष्ट होत असल्यामुळे या प्राण्यांनी आता मोर्चा गावांसह शहरांकडे वळविला आहे. जायकडवाडी वसाहतीसह परिसरातील आशीर्वादनगर, समाधान कॉलनी, शिवरामनगर, ममता कॉलनी, गजानन नगर परिसरात माकडांची टोळी दाखल होत आहे. 


 नागरिकांमध्ये भिती
दहा-बाराच्या संख्येने दाखल होत असलेल्या या माकडांमुळे नागरिकांत मोठी भिती निर्माण होत आहे. एकदाच दाखल होत घराच्या छतावर, झाडांवर ही माकडे बसू लागली आहेत. या माकडांच्या टोळीत मादीसह छोटे पिलू असेल तर नागरिकांची मोठी करमणूक होत असते. गुरुवारी (ता.१९) सकाळी सात-आठ माकडांची टोळी आशीर्वादनगरात दाखल झाली होती. यात एका मादी माकडासोबत असलेल्या छोट्याश्या माकडाच्या पिलाने नागरिकांची मोठी करमणूक केली. घराच्या छतावर, झाडावर उड्या मारत असलेल्या या छोट्या पिलामुळे बच्चे कंपनी जाम खुश झाली. 

माकडांचा चांगला पाहुणचारही
छोट्या पिलांमुळे घरातील बच्चेकंपनी, अबालवृध्दांची करमणूक होत असल्याने अनेक जण या माकडांचा अत्यंत चांगला पाहुणचारही करत आहेत. वसाहतीतल नागरिक माकडांना खाण्यासाठी अन्न आणि पाणी ठेवत आहेत. अद्याप या वानरराजांनी मर्कटलीला दाखवलेल्या नसल्याने सध्या तरी कोणाचीही त्यांच्याविरोधात तक्रार नाही. मात्र अनेकवेळा घराच्या व्हरांड्यात, छतावर ठेवलेले, वाळत घातलेल्या पदार्थांवर ही माकडांची टोळी ताव मारू लागली आहे. अचानक दाखल झालेली माकडे इकडून-तिकडून उड्या मारताना सर्रकन जवळून जात असल्याने अनेकवेळा नागरिक भयभित होत आहेत. त्यात घरातील साहित्य, पदार्थावर ताव मारल्या जात असल्याने महिला वर्गात या माकडांची भीती निर्माण झाली असून वनविभागाने या माकडांना पकडून पुन्हा जंगलात सोडावे, अशी मागणी केली आहे. 

पशु-पक्ष्यांना संरक्षण नाही
दरम्यान, सध्या सुरू होत असलेल्या उन्हाळ्यामुळे या माकडांना जंगली भागात अन्न, पाणी मिळणे दुरापास्त होत असल्याने त्यांचे कळप सैरभैर होऊ लागले आहेत. जंगलातील अनिर्बंध वृक्षतोड आणि माती उत्खननामुळे येथील पशु-पक्ष्यांना संरक्षण राहिले नसून, पर्यायाने जंगलातील माकडांनी मोर्चा गावांकडून आसपासच्या शहरांकडे वळविला आहे. ही माकडे  परभणीतील नवीन वसाहतीतील बिनधास्तपणे रस्ते, इमारतींवर फिरताना दिसत आहेत.

बंदोबस्त करण्याची मागणी 
माकडांच्या या टोळीत छोट्या शेपटीच्या पांढऱ्या माकडाने मात्र, नागरिकांत मोठी भिती निर्माण केली आहे. हे माकड बिनधास्त घरात घुसते आणि घरातील साहित्य पळवते. एकाच ठिकाणी एक ते दिड तास ठिय्या मारत असल्याने तेथील नागरिकांत भिती निर्माण होते. या माकडाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com