
जालना : शहराला एक रुपयाचे वीजबिल न येता पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयाच्या सुरक्षा भिंतीचे पिचिंगचे काम वर्षभरापासून लघुपाटबंधारे विभाग आणि मनपा यांच्या गोंधळात दुर्लक्षित झाले. त्यात यंदा जोरदार पाऊस झाल्यानंतर जलाशय ओव्हरफ्लो झाला आहे. मात्र, सुरक्षा भिंतींच्या पिचिंगचे दगड निखळल्याने आणि सुरक्षा भिंतीवर मोठमोठे झाड उगवल्याने शंभर वर्षे वय असलेल्या जलाशयाची सुरक्षा रामभरोसे आहे.