पालकमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करा

varsha gaikwad
varsha gaikwad

हिंगोली : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत राज्यात सातत्याने वाढ होत आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात राखण्यात मदत झाली आहे. मात्र, आपला जिल्हा लवकरात-लवकर ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शनिवारी (ता.नऊ) आढावा बैठकीत केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री प्रा. गायकवाड बोलत होत्या. या वेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.

गरज पडल्यास कारवाई करावी

या वेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या, कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या नागरिकांची तत्काळ चाचणी करावी, सर्वेक्षण करताना माहिती न देणाऱ्या किंवा माहिती लपवणाऱ्या नागरिकांवर गरज पडल्यास योग्य ती कारवाई करावी. 

नागरिकांवर योग्य उपचार करावेत

तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, प्रशासनाने प्रतिबंधीत क्षेत्रात अत्यावश्यक सेवा घरपोच मिळतील यासाठी नियोजन करावे. कोरोनाबाधितांबरोबरच इतर आजारी नागरिकांवर योग्य उपचार करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या...

- डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, विविध विभागाचे कर्मचाऱ्यांनीही आपली काळजी घ्यायला हवी.
- अखंडीत वीज पुरवठा सुरु राहिल याबाबत महावितरणने तत्काळ कार्यवाही करावी. तसेच प्रलंबित कामेही पूर्ण करावीत.
- अन्न-धान्यापासून कोणीही वंचित राहता कामा नये, प्रतिबंधित क्षेत्रातही घरपोच धान्य पोचविण्याचा प्रयत्न करावा.
- खतांच्या व बियाणांच्या बाबतीत कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी. - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजूरांना कामे उपलब्ध करुन द्यावीत.
- पाणीटंचाई निवारणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. ज्या गावातून मागणी येईल त्यांना तत्काळ पाणी पुरवठा करण्यात यावा.

हिंगोलीत २३ रुग्णांचे अहवाल प्रलंबित

हिंगोली : जिल्ह्यातील क्वॉरंटाइनसेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या २३ रुग्णांचे थ्रोट स्वॅब नमुन्याचा अहवाल प्रलंबित आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सात क्वॉरंटाइन सेंटरमध्ये आतापर्यंत एक हजार ३५५ संशयित रुग्ण दाखल झाले होते.

८८ कोरोनाबाधित रुग्ण

 त्यापैकी एक हजार २३५ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे एक हजार ८५ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या ८८ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून २३ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. तसेच शनिवारी नवीन २५९ संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com