हिंगोली - वसमत तालुक्यातील गुंडा येथे ओढ्याला आलेल्या पुरात शेतातून परतणाऱ्या दोन शेतकरी महिला वाहून गेल्याची घटना शुक्रवार ता. १२ रोजी सायंकाळी घडली. .वसमत तालुक्यात शुक्रवारी जोरदार पाऊस झाला या पावसामुळे पुढे नाल्यांना पूर आला आहे. चारच्या सुमारास पाऊस झाल्यानंतर शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिला घराकडे परतत असताना गुंडा शिवारात असलेल्या ओढ्याला आलेल्या पुरातून येत असताना दोन महिला वाहून गेल्या आहेत..गयाबाई अंबादास सारोळे (वय-६०) आणि सखुबाई विश्वनाथ भालेराव (वय-५५) अशी त्यांची नावे आहेत. या महिला इतर महिलांसोबत शेतातून परत येत होत्या. ओढ्यातील पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे त्या वाहून गेल्या..त्यांच्यासोबत असणाऱ्या एका शेतकऱ्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, हात निसटल्याने दोघी वाहून गेल्या घटनेची माहिती मिळतात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तातडीने घटनास्थळी पथकाला पाठवले असून सायंकाळी उशिरापर्यंत शोध सुरू केला मात्र त्या मिळून आल्या नाहीत..अंधारामुळे शोध कार्य थांबवण्यात आले असून, शनिवारी सकाळी पुन्हा शोध कार्य राबवण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिली. हा ओढा पुढे आरळ तेलगाव या शिवारात जातो त्यामुळे त्या भागात देखील शोध घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.