Beed Flood: ५१ जणांना सुखरूप वाचवले, दोघांचा मृत्यू; ३६ गावांचा संपर्क तुटला; आष्टी तालुक्यात पाच तलाव फुटले

NDRF Rescue: बीड जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे ३६ गावांचा संपर्क तुटला आणि दोन जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ व वायुदलाच्या मदतीने ५१ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
Beed Flood

Beed Flood

sakal

Updated on

बीड : जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने हाहाकार माजवल्याने मध्यरात्रीपासून जिल्हाभरात अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली. सोमवारी (ता. १५) दुपारपर्यंत ३६ गावांचा संपर्क तुटला हेाता. पुरामुळे दोघांचा मृत्यू झाला, तर ५१ जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले. एनडीआरएफचे पथक तळ ठोकून आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com