Hingoli : E-KYC प्रमाणीकरणासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

‘किसान सन्मान’च्या लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक
PM Kisan Yojana
PM Kisan Yojanasakal
Updated on

हिंगोली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांचे बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवून ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना होत्या.

त्याअनुषंगाने राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले होते. सद्यःस्थितीत दोन जून अखेर राज्यातील आधार प्रमाणित १०६.६८ लाख लाभार्थ्यांपैकी ५७.३३ लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित ४९.१४ लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहे. त्यामुळे आता ३१ जुलै अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी निर्धारित वेळेत ई-केवायसी प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com