Hingoli : शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा

वसमत येथे आमदार राजू नवघरे यांचे ठिय्या आंदोलन
आमदार राजू नवघरे
आमदार राजू नवघरे sakal

वसमत : महावितरणकडून शेतकऱ्यांची वीज तोडणी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या विरोधात आमदार राजू नवघरे आक्रमक झाले. त्यांनी मंगळवारी (ता. २१) कार्यकर्त्यांसह महावितरण कंपनीच्या कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन केले.

थकबाकीच्या नावाखाली कृषीपंपाची वीज तोडणी महावितरण करीत आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या पिकांबरोबरच गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याची हेळसांड होत आहे. आधीच निसर्गाच्या

दुष्टचक्रात नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांना महावितरणच्या कारवाईने मेटाकुटीस आणले आहे. यावर आमदार नवघरे यांनी शेतकरी व कार्यकर्त्यांसह मंगळवारी महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. वीज देयक थकबाकीचे सुलभ हप्ते पाडून देण्याची सूचनाही यावेळी आमदार नवघरे यांनी केली.

वीज तोडणी बंद करून शेतकऱ्यांस वेठीस धरण्याचा प्रकार तत्काळ बंद न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी महावितरणला दिला. आंदोलनात शेतकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com