

Hingoli News
esakal
हिंगोली: गेल्या काही दिवसांपासून हिंगोली शहरात दहशत माजवणाऱ्या पिसाळलेल्या कोल्ह्याला वन विभागाने मंगळवारी (ता. ३१) अत्यंत शिताफीने जेरबंद केले. या कोल्ह्याने नागरिकांवर हल्ले करून तिघांना जखमी केले होते, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. अखेर वन विभागाच्या यशस्वी कारवाईमुळे शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.