

"पंधरा लाखांचा मोह टाळला!" पत्रकार शंकर कंगोरे यांच्या प्रामाणिकपणाची नांदेड जिल्ह्यात मोठी चर्चा.
Sakal
अर्धापूर : आजकाल प्रामाणिकपणा रहिला नाही, थोडी रक्कम पाहिली की मनुष्याचे मन बदलते, थोड्या रकमेसाठी एकमेकांत गैरसमज निर्माण होतात.पण यालही काही अपवाद ठरणाऱ्या घटना घडत असतात व माणुसकीचे व प्रामाणिकपणाची दर्शन घडते.आसाच एक सुखद अनुभव यांना आला आहे.त्यांचा हरवलेला तब्बल पंधरा लाखांचा ऐवज व ७० हजार रोख रक्कम कामठा बुद्रुक (ता अर्धापूर) येथील पत्रकार शंकर कंगारे यांनी परत दिला व आजही प्रामाणिकपणे काम करणारी माणसं आहेत याची प्रचिती दिली.